शीतल टाईम्स //-बेकायदा सावकारीवर लगाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सक्रिय २१ सावकारांवर गुन्हे दाखल; नियमबाह्य सावकारांकडून कर्ज घेऊ नका – प्रशासनाचा इशारा

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेकायदा सावकारीवर लगाम ; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सक्रिय

२१ सावकारांवर गुन्हे दाखल; नियमबाह्य सावकारांकडून कर्ज घेऊ नका प्रशासनाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अंमलबजावणीसाठी ही समिती सक्रियपणे काम करणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बेकायदा सावकारी करणाऱ्या २१ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईला अधिक बळकटी देण्यासाठी ही समिती महत्त्वाची ठरणार आहे.

बैठकीत शेतकरी, व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले की, केवळ परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. तसेच, सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार व्याजाचे दर फलक स्वरूपात स्पष्टपणे लावणे बंधनकारक आहे. तक्रार असल्यास ती कोठे करावी, याची माहितीही स्पष्टपणे फलकावर नमूद करावी, असे निर्देश देण्यात आले.

बेकायदा सावकारी, जादा व्याज आकारणी, वसुलीसाठी होणारा त्रास यासंदर्भात नागरिकांनी आपले नाव गोपनीय ठेवून सहकार विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही बैठकीतून करण्यात आले.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव