शीतल टाईम्स //पत्रकारांनी एखाद्या घटनेची एकतर्फी बाजू न मांडता दुसरी बाजुही समाजापुढे आणली पाहिजे - सुनिल मुथा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

पत्रकारांनी एखाद्या घटनेची एकतर्फी बाजू न मांडता दुसरी बाजुही समाजापुढे आणली पाहिजे - सुनिल मुथा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी श्रीरामपूरः- पत्रकारिता करताना पत्रकारांनी कोणताही पूर्वग्रहदुषितपणा न राखता एखाद्या घटनेचे वृत्तांकन केले पाहिजे. तसेच एखाद्या प्रकरणी एक बाजू मांडताना दुसरी बाजुही समाजासमोर आणली पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर आरोप होत असतील तर त्या व्यक्तीला आपली बाजु मांडण्याचीही संधी दिली पाहिजे जेणेकरुन त्या व्यक्तीच्या सामाजिक प्रतिमेची हानी होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य सुनिल मुथा यांनी केले. राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्काराचे कार्यक्रमात बोलताना श्री.मुथा म्हणाले की, पत्रकारिता ही निरपेक्ष असली पाहिजे. एखाद्या घटनेबाबत त्यातल्या त्यात ती सामाजिकतेशी निगडीत असेल तर त्या घटनेच्या दोन्ही बाजू समाजापुढे आणल्या पहिजेत. एकतर्फी बातमी दिल्यास एखाद्या चांगले सामाजिक काम करणाराचीही प्रतिमा डागाळते. अशावेळी ज्याच्यावर आरोप झाले आहेत त्या व्यक्तीलाही आपली बाजू मांडण्य...