पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतलटाईम्स - जिल्ह्याच्या साहित्य चळवळीत चांगले योगदान देऊ :- किशोर मरकड. शब्दगंधच्या वतीने किशोर मरकड यांचा सत्कार शीतलटाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)

इमेज
जिल्ह्याच्या साहित्य चळवळीत चांगले योगदान देऊ :- किशोर मरकड शब्दगंधच्या वतीने किशोर मरकड यांचा सत्कार शीतलटाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी माझी निवड म्हणजे आपल्या सर्वांची निवड आहे. त्यामुळे हा सत्कार केवळ माझा एकट्याचा नसून सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांचा आहे. आगामी काळात शब्दगंध सोबत जोडून घेऊन साहित्यिक चळवळीला चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन मसाप अहमदनगर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर मरकड यांनी केले. मसाप अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किशोर मरकड यांचा शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय येथे साहित्य रसिक उद्योजक सुरेश चव्हाण यांच्या हस्ते व प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली शाल, पुष्पगुच्छ,पुस्तकं व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, कालचे विद्यार्थी कि...

शीतलटाईम्स - सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला - भगवान फुलसौंदर शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

इमेज
सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला - भगवान फुलसौंदर शीतल  टाईम्स । अहमदनगर  प्रतिनिधी   सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला. समाजाची अधोगती थांबवून, समाजातील मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून समाजाला समता, स्वातंत्र्य आणि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर ज्योतिबांनी संघर्ष केला. नीतीने वागणे हाच खरा मानवधर्म असल्याची शिकवण त्यांनी दिली. तत्कालीन अंधार युगात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून संपूर्ण मानवाचे जीवन प्रकाशमय केले असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले. जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य, अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ, जय युवा अकॅडमी, जीवन आधार बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालिकाश्रम रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी फुलसौंदर बोलत होते. यावेळी महापालिकेचे माजी सभापती किशोर डागवाले, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विशाल वायकर, दत्ता जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍...

शीतलटाईम्स - डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरणाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा भीमगर्जना संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा फिरोज पठाण यांचा इशारा शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
श्रीरामपूरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये बेकायदेशीर मुरूम उत्खनन ! डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरणाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा  अन्यथा भीमगर्जना संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा फिरोज पठाण यांचा इशारा शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी  श्रीरामपूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये झालेल्या डांबरीकरण मुरमीकरण व खडीकरण हे कामे अंदाज पत्रकाप्रमाणे झालेली नाहीत. शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता व बेकायदेशीररित्या रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून मुरूम उत्खनन केलेले आहे व सदर भागातील सर्व खडीकरण मुरमीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. रस्ते बनवण्याकरिता निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून केले असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.   वरील सर्व झालेली कामे शासकीय प्रयोग शाळा व क्षेत्रीय प्रयोगशाळा यांच्याकडून तपासणी करण्यात यावी व अधिकारी संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांनी दिला आहे. ******...

शीतलटाईम्स - अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस अटक शीतलटाईम्स बेलापुर(प्रतिनिधी)

इमेज
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस अटक शीतलटाईम्स बेलापुर(प्रतिनिधी) बेलापुर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन नेवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते. त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट भोईटे हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले त्या नंतर काही वेळाने  पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्या...

शीतलटाईम्स ।- नवीन संचालकांनी राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक हित जोपासणे महत्त्वाचे - रफिक मुन्शी नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुक शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

इमेज
नवीन संचालकांनी राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक हित जोपासणे महत्त्वाचे - रफिक मुन्शी नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुक  शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी) अहमदनगर जिल्याच आर्थिक घडामोडीचं वैभव असणारी अर्बन बँक, ज्या बँकेचे एकूण सभासद 55 हजार 991 असून, एकूण ठेवी 655 कोटी आहेत. मागील काही वर्षांपासून बर्‍याच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला होता. त्यामुळे निश्‍चितच काही प्रमाणात बँकेची प्रतिमा डागाळली. त्यामुळे बँकेच्या सभासदाच्या मनामध्ये संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. सध्या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक होत असून, राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक व सभासदांचे हित जोपासणे महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना माजी समाज कल्याण अधिकारी तथा बँकेचे सभासद रफिक मुन्शी यांनी म्हंटले आहे.   रविवारी झालेल्या नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानानंतर मुन्शी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. मुन्शी यांनी निवडून येणार्‍या पॅनलला सभासद हित आणि बँकेची आर्थिक परिस्थिती म्हणजे कर्जवसुली, बोगस गहाण सोने प्रकरण, या व इतर आरोप करण्यात आलेल्या विषयातील सत्यता पडताळणी करून बँक कारभार...

शीतलटाईम्स - महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूरात अभिवादन शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

इमेज
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूरात अभिवादन शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी  सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अभिवादन करण्यात आले.   येथील सावता महाराज मंदिरामध्ये विविध पक्षातील नेते, पुढारी, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच पत्रकारांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादीत केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, बेलापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, महात्मा फुले समता परिषदेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, बेलापुर सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन कलेश सातभाई, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, प्रभात कुऱ्हे, संजय रासकर, संदीप कुऱ्हे, महेश कुऱ्हे, साईनाथ शिरसाठ, रावसाहेब अमोलिक, प्रफुल्ल कुऱ्हे, मंगेश गाढे, रामा नारळे आदी उपस्थित होते. **************************************************** ************************************************ ****    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्र...

शीतलटाईम्स - " वायली" लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 चा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार शीतलटाईम्स - बेलापुर (प्रतिनिधी)

इमेज
" वायली" लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 चा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार  शीतलटाईम्स - बेलापुर (प्रतिनिधी) संक्रापुर तालुका राहुरी येथील तमाशा कलावंत शाहीर संभाजीराव जाधव यांच्या मुलांनी  तयार केलेल्या" वायली" या लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 चा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार मिळाला असुन ग्रामीण भागातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   प्रणव वाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या वायली लघुपटास गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे या लघुपटात ग्रामीण भागातील कौटुंबिक समस्या मांडल्या आहेत. कौटुंबिक वाद आणि आपापल्या पालकांमधील मतभेद झालेले मनभेद तसेच या वादाचा दोन चुलत भावांच्या सुंदर नात्यावर कसा परिणाम होतो हे हृदयस्पर्शी चित्र लघुपटमध्ये दाखवले आहे. वायली लघुपटाचे कथा लेखन स्वतः प्रणव वाणी यांनी आणि पटकथा लेखन शुभम वाणी यांनी केले होते लघुपटाची निर्मिती प्रा. मोहन वाणी यांनी केली. कॅमेरामन म्हणून सुखदेव आढाव यांनी काम केले या लघुपटास सत्यजित सराफ यांनी संगीत दिले आहे. या लघुपटाची निवड लंडन, मध्यप्रदेश,...

शीतलटाईम्स - दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे श्रद्धांजली शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

इमेज
दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे श्रद्धांजली  शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे कोतवाली पोलिस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली हातात तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित मानस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या तर संविधान उद्देशिका चे वाचन करून उपस्थितांना नागरिक कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली कोतवाली पोलीस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कचरे, राजेंद्र गर्गे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार, अर्जुन चव्हाण, समीर सय्यद, सलीम शेख, गौरव ढोणे, विक्रम चव्हाण, हाजी जहीर सर, मुतुजा सय्यद व कोतवाली पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलि...

शीतलटाईम्स - यंदाच्या सन २०२१/२२ च्या गळीत हंगामासाठी'अशोक' देणार प्रतिटन रु.२४०० ऊस दरः कहांडळ शीतलटाईम्स । अशोकनगर (प्रतिनिधी)

इमेज
यंदाच्या सन २०२१/२२ च्या गळीत हंगामासाठी'अशोक' देणार प्रतिटन रु.२४०० ऊस दरः कहांडळ शीतलटाईम्स । अशोकनगर (प्रतिनिधी) अशोक सहकारी साखर कारखान्याना व्यवस्थापनाने यंदाच्या सन २०२१-२२ च्या गळित हंगामात गळितास येणाऱ्या ऊसासाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिटन रु.२ हजार ४०० प्रमाणे भाव देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली. या संदर्भात माहिती देताना श्री.कहांडळ यांनी सांगीतले की, अशोक कारखाना यंदाच्या गळित हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसासाठी योग्य दर देईल, अशी भुमिका कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी गळित हंगाम शुभारंभप्रसंगी जाहिर केली होती. या पार्श्वभुमीवर व्यवस्थापनाने सकारात्मक भुमिका घेत यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन रु.२ हजार ४०० असा भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री.कहांडळ यांनी दिली. **************************************************** ************************************************ ****    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  - *****  साप्त...

शीतलटाईम्स - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेकडरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ - डॉ. बी.एन.पवार शीतलटाईम्स । बेलापूर (प्रतिनिधी)

इमेज
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेकडरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ - डॉ. बी.एन.पवार शीतलटाईम्स । बेलापूर (प्रतिनिधी)  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रग्रंथ असल्याचे उद़्गार बेलापुर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर बी एन पवार यांनी काढले.   बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने "भारतीय संविधान दिन" संपन्न करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेचा इतिहास त्यांनी  विशद करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला. या लोकशाही समाज व्यवस्थेत न्याय, समता, स्वातंत्र, बंधुता ही मुल्य प्रवर्धित करुन ही राज्यघटना डॉ.आंबेडकर यांनी जनतेप्रती अर्पण केली आहे. सर्व जाती, धर्म, भाषा ,पंथ यांना मार्गदर्शक ठरावा असा एकमेव ग्रंथ आहे. हे भारतीय संविधान देशातील सर्वात लहान संस्था गाव पातळीवरील ग्रामपंचायत ते देशाची सर्वोच्च संस्था संसद, न्यायपालीका, प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला मार्गदर्शन करते. 26 नोव्हेंबर 1949 ला ...