शीतलटाईम्स ।- नवीन संचालकांनी राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक हित जोपासणे महत्त्वाचे - रफिक मुन्शी नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुक शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)
नवीन संचालकांनी राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक हित जोपासणे महत्त्वाचे - रफिक मुन्शी
नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुक
शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्याच आर्थिक घडामोडीचं वैभव असणारी अर्बन बँक, ज्या बँकेचे एकूण सभासद 55 हजार 991 असून, एकूण ठेवी 655 कोटी आहेत. मागील काही वर्षांपासून बर्याच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला होता. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात बँकेची प्रतिमा डागाळली. त्यामुळे बँकेच्या सभासदाच्या मनामध्ये संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. सध्या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक होत असून, राजकारणापेक्षा बँकेचे आर्थिक व सभासदांचे हित जोपासणे महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना माजी समाज कल्याण अधिकारी तथा बँकेचे सभासद रफिक मुन्शी यांनी म्हंटले आहे.
रविवारी झालेल्या नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानानंतर मुन्शी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. मुन्शी यांनी निवडून येणार्या पॅनलला सभासद हित आणि बँकेची आर्थिक परिस्थिती म्हणजे कर्जवसुली, बोगस गहाण सोने प्रकरण, या व इतर आरोप करण्यात आलेल्या विषयातील सत्यता पडताळणी करून बँक कारभार आर्थिक दृष्टया उत्तम कसा होईल? याकडे लक्ष देण्याचे काम करावे लागणार आहे. बँक प्रशासन म्हणजे अधिकारी व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन या पुढे बँकेत प्रशासक बसविण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यावे. या सभासदांच्या अपेक्षा आहेत.
बँके सुरळीत चालावी. सभासदांना लाभांश किती मिळतो, कर्जप्रकरणे योग्य होतात का, कर्जवसुली योग्य होते का, प्रशासकीय अधिकारी नियमानुसार काम करतात का? या सर्व प्रश्नांवर कार्य करावे लागणार आहे. तर हे कार्य निवडून आलेले संचालक पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) सुद्धा वाढू नये या करिता उपाययोजना करण्याचे आवाहन नवीन संचालक मंडळास राहणार आहे. या सर्व त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा