शीतल टाईम्स //'आई'चा शाम !

'आई'चा शाम ! शामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक बालपणी पासूनच आवडीचा विषय होते, तो शाम आणि त्याची आई त्या दोघां मधील प्रेम, संवाद, आपुलकी, जिव्हाळा कसा असेल या उत्सुकतेपोटी शामची आई पुस्तक वाचले आणि ते इतके आवडले की आजही मनाच्या एका कप्यात शाम आणि त्याची आई दोघेही जपले आहेत. आता आजकाल मनात एक प्रश्न पडतो, शाम ने लिहिलेली आई खूप कष्टाळू, करारी, शिस्त प्रिय, मुलांना संस्कार देणारी होती, प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाला साथ देणारी आदर्श माता होती, सगळे खरे, मना पासून मान्य... पण, शाम सुद्धा कमालीचा संवेदनशील, आज्ञाधारक, काळजी घेणारा, काळजी करणारा होता म्हणूनच तर तो आपल्या आईला अमर करू शकला पुस्तक रूपाने... आजची परिस्थिती पाहता आजही शमच्या आई सारख्या अनेक माता पाहायला मिळतात. ज्या घरी दारी सगळीकडे लढत असतात, त्यांचे मुलांवर बारकाईने लक्ष असते, अतिशय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांच्यातही पहायला मिळते पण आजचा शाम तसा दिसत नाही... आजचा शाम खूप वेगळा आहे, त्याची संवेदनशीलता कमी झाली आहे का? तो बेजबाबदार झाला आहे का? सर्व काही मुबलक असतानाही त्याचा सर्वांगीण विकास का झालेला दिसत नाह...