शीतल टाईम्स । - नामदेव प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योध्दांचा सन्मान शीतल टाईम्स । श्रीरामपूर । प्रतिनिधी
नामदेव प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या ऋणातून उतराई होण्यासाठी - कोरोना यौध्दांचा सन्मान होणे गरजेचे आहे. अहमदनगर नामदेव प्रतिष्ठाण या संस्थेने हा उपक्रम राबविल्याने कोरोना योध्दांना शाबासकीची थाप मिळाली असल्याचे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी करोना योध्दांचा सत्कार समारंभाप्रसंगी केले. प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आ. कानडे पुढे म्हणाले की, संत नामदेवांनी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. सर्व संतांना बरोबर घेऊन त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचा धावा केला. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विषयी अनेक उत्तम प्रसंग सांगून त्यांची ख्याती श्रोत्यांपुढे मांडली. संत नामदेवांविषयी समाजाला अतिशय सविस्तर माहिती देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अमदनगर नामदेव प्रतिष्ठानला आमदार निधीतून सभामंडपसाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही यावेळी आ. कानडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. लहू कानडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सचिन गुजर, भाजपच्या कर्जत महिला अध्यक्षा मनीषा वडे, आरोग्याधिकारी मोहन शिंदे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापुसाहेब वैद्य, नाशिक प्रांतिकचे माजी अध्यक्ष नामदेवराव भुसे, दै.जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज आगे, पत्रकार मिलींद साळवे, मेजर सरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोना महामारीत जिवांची पर्वा न करता रुग्णसेवा केली, आशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा नामदेव प्रतिष्ठाणने हा स्तुप्त उपक्रम घेऊन कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सन्मान करून समाजात एक आगळा-वेगळा उपक्रम केला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अहमदनगर जिल्हा नामदेव प्रतिष्ठाण या संस्थेला एक मोकळा प्लॉट उपलब्ध झाल्यास त्यांना आवर्जुन देण्यात येऊन त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मदत होईल.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कारार्थी अरविंद्र गुजर (संगमनेर), डॉ. उरणकर (पाथर्डी), डॉ. सौ. शीतल भगत (कोल्हार), डॉ. ओंकार भगत (कोल्हार), सौ. माधवी भगत (कोल्हार) सौ. मनिषा वडे (कर्जत), कु. साक्षी राजेंद्र वडे (कर्जत), शैलेश धोकटे (भिंगार, नगर), प्रसन्न धुमाळ (श्रीरामपूर) आशा पगारे मॅडम (श्रीरामपूर), सुनिता कारंजकर (चंदनापूरी, संगमनेर), आरती चांडोले मॅडम (लोहारे कसारे, संगमनेर), जितेंद्र डिंगोरे (चंदनापूरी, संगमनेर), मिलींदकुमार साळवे (श्रीरामपूर), मेजर सरदार ( श्रीरामपूर) नितीन द्वारकादास नेवासकर (संगमनेर) आदींचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन यौध्दांचा सन्मान करण्यात आला.
समाजातील वाद मिटवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापु वैद्य यांनी केले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) लचके, सचिव अशोक दिवे सर, खजिनदार पत्रकार नरेंद्र लचके, संजय काकडे, संजय माळवदे, केशव भगतसर, विश्वस्त आबा उरणकर, कैलास खंदारे, संजय गुजर, राजा भाऊ चांडोले, दिपक चांडोले, मुकूंद देव्हारे, टापसे आदी बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव भगतसर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिवेसर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा