शीतल टाईम्स //मोहंमद पैगंबराचे विचार आचरणात आणण्याची गरज -अरुण पा, नाईक

शीतल टाइम्स प्रतिनिधी मोहंमद पैगंबरांचे विचार आचरणात आणण्याची गरज -अरुण पा, नाईक बेलापुरात "जल्सा-ए-सिरतुन नबी" व "वृक्षारोपण" कार्यक्रम संपन्न शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर :- ( प्रतिनिधी )- मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे एक थोर समाज सुधारक होते यांनी समाजात असणाऱ्या अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच महिलावर होणारे अत्याचार यावर आळा घातला त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांनी व्यक्त केले गौसे आजम सेवाभावी संस्था व जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे जलसा -ए-सिरतुन नबी तसेच वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला ,त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार लहुजी कानडे, जि.प.सदस्य शरद नवले, कृ.उ.बा.स.उपसभापती अभिषेक खंडागळे, अक्षय पा.नाईक, आदिंनी मनोगत व्यक्त करताना गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या व संस्थापक मुख्तार सय्यद व अध्यक्ष सुलतान शेख यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील समाज कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते आपल...