पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतलटाईम्स - नारायण गव्हाण खून खटल्यातील आरोपींची जामीनावर मुक्तता

इमेज
नारायण गव्हाण खून खटल्यातील आरोपींची जामीनावर मुक्तता   शीतल  टाईम्स । पारनेर  प्रतिनिधी नारायण गव्हाण (ता. पारनेर) येथील बहुचर्चित खून खटल्यातील आरोपी राजेश शेळके व इतर आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अ‍ॅड. परिमल की. फळे यांनी दिली. पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथे राजाराम जयवंत शेळके यांचा धारदार हत्याराने 11 जून 2021 रोजी खून केल्याप्रकरणी सुपा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या आरोपी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. तपासी अधिकारी यांनी तपास पूर्ण करून, आरोपी राजेश शेळके, संग्राम कांडेकर, अनिकेत कांडेकर यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलेले आहे. सदर तपासात राजाराम शेळके यांचा खून पूर्ववैमनस्यातून तसेच पूर्वनियोजित कट करून मयत राजाराम शेळके यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या खटल्यामध्ये सर्व आरोपी यांची बाजू अ‍ॅड.परिमल की. फळे मांडत आहेत. सदर सुनावणीदरम्यान अ‍ॅड. फळे यांनी आरोपीतर्फे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन अ‍ॅड. फळे यांचा...

शीतलटाईम्स - तथागत बुद्धिस्ट सोसायटीने लावले गरीब दांम्पत्याचे लग्न

इमेज
तथागत बुद्धिस्ट सोसायटीने लावले गरीब दांम्पत्याचे लग्न लग्नाचा सर्व खर्च उचलून नव दांम्पत्यांना दिले संसार उपयोगी साहित्य सामुदायिक विवाहाचे नियोजन देखील केले जाणार -संजय कांबळे   शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी तथागत बुद्धिस्ट सोसायटीने गरीब दांम्पत्याचे लग्न जमवले. या दांम्पत्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचा रेल्वे स्टेशन येथील भीमराज बुद्धविहार येथे संस्थेच्या खर्चाने लग्न लावून देण्यात आले. तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून बौध्द समाजातील युवक-युवतींना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळावा या भावनेने   नुकतेच बुध्दिस्ट वधू-वर सुचक केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. या केंद्राची सुरुवात होण्याअगोदरच संस्थेच्या वतीने गरीब दांम्पत्याचे लग्न लावून देण्यात आले. दिपक गायकवाड आणि वैशाली कदम या वधू-वरांचा विवाह नुकताच पारंपारिक पध्दतीने पार पडला. या दांम्पत्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्कार सचिव सत्येंद्र तेलतुंबडे यांनी आशीर्वादित केले. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी गोरगरिबांची लग्न लावण्याचा संदेश दिला. तो तथागत बुद्धिस्ट सोसायटीने आचरणात आणला. दीन-दुबळ्य...
इमेज
       शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी      शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी ****************************************************** ******************************************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  - *****  साप्ताहिक शीतल टाईम्स  ****** *******  R.N.I.NO.MAHMAR/2003/13182  *******  - बातम्या व जाहिरातीसाठी   ************- संपर्क - ************* ✒️  मुख्य संपादक   -  नरेंद्र लचके  **********  मो.   9225327176 ✒️  उपसंपादक  -  सुहास शेलर **********  मो.  8485867429 ✒️  जिल्हा प्रतिनिधी  -  शकील(बाबा)शेख **********  मो.  9273729867    ******************************************************* *******************************************************

शीतलटाईम्स - गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लरचा शुभारंभ

इमेज
गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लरचा शुभारंभ शीतल  टाईम्स । प्रतिनिधी गोंडेगाव  अशोक शेलार गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लर अँड एक्वा या दालनाचा शुभारंभ चैतन्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गणेश भांड यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. गोंडेगाव पुणतांबा रोड येथे सुरू झालेल्या या दालनामध्ये चैतन्य मिल्क चे दर्जेदार प्रॉडक्टसह थंड व शुद्ध पाणी जार उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती वेदिका मिल्क पार्लरचे मालक यशवंत निवृत्ती फोपसे यांनी दिली. यावेळी रामभाऊ जगताप पाटील, शंतनु फोपसे, यशवंत फोपसे, संदिप हरगुडे, संतोष भवार, नारायण फोपसे, अनिल रोकडे, सरपंच सागर बढे, उपसरपंच योगेश बढदे, प्रविण फोपसे, बाळासाहेब फोपसे, विजय फोपसे, शांताराम बढे, शेलार मामा आदी मान्यवर उपस्थित होते. **************************************************** ****************************************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  - *****  साप्ताहिक शीतल टाईम्स  ****** *******  R.N.I.NO.MAHMAR/2003/13182  *******  - बातम्या व जाहिरातीसाठी ...

शीतलटाईम्स - बेलापूर महाविद्यालयामध्ये मिशन युवा स्वास्थ्य अभियानातंर्गत लसीकरण शिबीर संपन्न

इमेज
बेलापूर महाविद्यालयामध्ये मिशन युवा स्वास्थ्य अभियानातंर्गत लसीकरण शिबीर संपन्न शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी बेलापूर  येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग बेलापूर, मा.सहशिक्षण संचालक पुणे (उच्च शिक्षण विभाग) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानातंर्गत लसीकरण शिबीर घेण्यात आले. डॉ.चोखर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.कोकाटे यांनी सांगितले की, महाविद्यालय नियमितपणे सुरु झाले आहे. परंतु, अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. सदर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोविड- 19 लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ.संजय नवाळे, राष्ट्रीय सेवा योज...

शीतलटाईम्स - स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न

इमेज
स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न  शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी बेलापूर  बेलापूर येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ अरूण पाटील नाईक मित्र मंडळ व अरुणोदय फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांचा उपस्थित संपन्न झाले.  सदर आयोजित स्पर्धेसाठी राष्ट्रीय पुरुषांचे चित्र हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये पंचक्रोशितील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला. क्रमांक 1, 2, 3 आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच, इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य, तालुका कॉंग्रेसचे  अध्यक्ष अरूण पाटील नाईक, बेलापूर सोसायटी चे व्हाईस चेअरमन कलेश साथभाई, माजी सभापती दत्तात्रय कुऱ्हे, अरुणोदय पतसंस्था संचालक शिवाजी वाबळे, ऐनतपुर सोसायटी चेअरमन चंद्रकांत नाईक, राजेंद्रशेठ श्रीगोड, प्रदेश सचिव अक्षय नाईक, अय्याज सय्यद, ज्ञानदेव रणदिवे, विक्रम नाईक, अकील बागवान, रघुनाथ वाघ सर, ऋषिकेश नाईक, गोविंद शिंदे, फुलारे, ...

शीतलटाईम्स - गळनिंब ची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

इमेज
     गळनिंब ची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात  संपन्न    शीतल  टाईम्स ।  प्रतिनिधी गळनिंब  गावाचा सन २०२२-२३चा  विकास आराखडा तयार करणे, सुधारीत वाड्या वस्त्यावरील पाणी योजना, गावांतर्गत रस्ते गटारी व वाडी वस्त्यावरील रस्ते, राष्ट्रीय तंबाखू नियंञण कार्यक्रमाची अंमलबाजावणी सामाजिक न्याय विभाग नवबौध्द घटकांचा विकास आदी विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन गळनिंब ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.            ग्रामसभा सरपंच शिवाजी चिंधे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रवरा बॅंकेचे मा.संचालक, हनुमान चिंधे, सुनिल शिंदे, डाॅ.सुनिल चिंधे, कैलास मारकड, दादा जाटे, गणेश देठे, रामदास भोसले, साहेबराव भोसले, संदिप शेरमाळे, सदस्य दत्तात्रय माळी, प्रा.बाळासाहेब वडितके, सौ.अनिता शेरमाळे, सौ.कविता चिंधे, संजय शिंदे, ग्रामसेवक राजू ओहोळ, आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सुनिल शिंदे यांनी लसिकरणात  नागरीकां...

शीतलटाईम्स - 'अशोक' च्या गळीत हंगामाचा शुभारंभ

इमेज
     'अशोक' च्या गळीत हंगामाचा शुभारंभ   शीतल  टाईम्स । अशोकनगर  प्रतिनिधी जागतिक स्तरावर  साखर उत्पादन घटल्याने साखरेच्या मागणीत वाढ होवून भाव वाढण्याचे  आशादायक चिन्ह आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने साखर उत्पादनासह कच्च्या साखर निर्मितीबरोबरच  इथेनॉलला केन्द्र शासनाने चांगले भाव जाहिर केल्याने अधिकाधिक इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाणात वाढ करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याने  इथेनॉल प्रकल्पाच्या सध्याच्या उत्पादन क्षमतेत  प्रतिदिन एक लाख लिटर्सपर्यन्त वाढ  करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.  अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री.मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले की, साखर कारखानदारी हा धंदा असून ऊसाचा भाव हा उत्पन्न व खर्च याचा हिशोब करुन ठरतो. संजीवनी, कोपरगाव व प्रवरा कारखाना देशी दा...

शीतलटाईम्स - भारतीय समर्थकांतील नैराश्य विश्वचषक स्पर्धेचं महत्व कमी करणार ? शीतल टाईम्स । डॉ.दत्ता विघावे

इमेज
     भारतीय समर्थकांतील नैराश्य विश्वचषक स्पर्धेचं महत्व कमी करणार ?   शीतल  टाईम्स । डॉ.दत्ता विघावे सातव्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्याच एक मोठा उलटफेर झाला. या स्पर्धेच्या संभावित विजेत्यांमध्ये आघाडीवर असलेल्या भारताला कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या भारताचा कट्टर वैरी पाकिस्तानकडून एक अनपेक्षित असा नामुष्कीजन्य पराभव स्विकारावा लागला. टि ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात या सामन्यापूर्वी भारत व पाकिस्तान यांच्यात पाच सामने झाले होते ते सर्व भारताने जिंकले होते. शिवाय यंदा भारताच्या संघात एका पेक्षा एक सरस खेळाडू असल्याने भारतीय क्रिकेट रसिकांना भारत शंभर टक्के जिंकणारच हा अंधविश्वास होता. परंतु प्रत्यक्ष सामन्यात खेळाच्या सर्वच क्षेत्रात पाकिस्तानने भारताला निष्प्रभ केले व कोणतेही अतिरिक्त नुकसान होऊ न देता आरामात लक्ष्य साध्य करून भारतीय संघाला धाडकन जमिनीवर आदळवले. त्यामुळे भारतीय समर्थकांत मोठी निराशा पसरली.   भारताच्या या पराभवाने भारतीय क्रिकेट रसिकांसाठी नुकताच सुरू झालेला विश्वचषक संपल्यासारखं वातावरण तयार झालं आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांची भार...