शीतल टाईम्स // कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा - प्रा.ज्ञानेश गवले कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी भारतीय जवान राष्ट्राप्रती देत असलेले समर्पण, त्याग, शौर्य आणि बलिदान यामुळेच देश सुरक्षित आणि समृध्द बनला आहे. भारतीय सीमांवर सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहे. त्यामुळेच शत्रु राष्ट्रांवर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा ,असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले. श्रीरामपूर तालुका आजी - माजी सैनिक संघटनेच्या वतीने रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिनानिमित्त अमर जवान स्मारक येथे आयोजित "एक दिया शहीदोंके नाम" या शहीद जवानांना अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. गवले बोलत होते. तालुका पोलिस संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी संजय भोंडवे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. शितल घोगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमानिमित्त सकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात बोरावके महाविद्...