पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स । - मतदार जागृतीसाठी निशुल्क ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शीतल टाईम्स । प्रतिनिधी अहमदनगर

इमेज
   मतदार जागृतीसाठी निशुल्क ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शीतल टाईम्स । प्रतिनिधी अहमदनगर      मतदार जागृतीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, निवडणुक विभाग, नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन गटासाठी ही स्पर्धा निशुल्क घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे व डोंगरे संस्था तथा वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले.  लोकशाही सदृढ व बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढण्याची गरज आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यास सक्षम उमेदवार निवडून येऊन विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी नागरिकांसह युवकांमध्ये मतदार जागृती करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून मतदार जागृती अभियानातंर्गत या स्पर्धेचे...

शीतल टाईम्स । - एस टी बस अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्टचा कारभार पारदर्शी करण्याचे श्रीगोड यांचे महसुल मंत्र्यांना साकडे शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
  एस टी बस अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्टचा कारभार पारदर्शी करण्याचे श्रीगोड यांचे महसुल मंत्र्यांना साकडे शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी      एस. टी. च्या अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्टचा कारभार धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार पारदर्शक व्हावा अशी मागणी जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रणजीत श्रीगोड यांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे .      या बाबत प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी महसुल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सन २०१६ पासून एस. टी. खात्याने एखादया प्रवाशाचा बसमधून प्रवास करताना मृत्यू झाल्यास त्याचे वारसदाराला १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून  आर्थिक सहाय्य व्हावी या करीता "अपघात सहाय्यता निधी " योजना तयार करून ट्रस्टची स्थापना केली. प्रत्यक्षात मात्र या घटनेतील उद्देश पाहून जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. वारंवार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांचे अध्यक्षतेखाली ७ वरिष्ठ अधिका-यांची ट्रस्टीज म्हणून नियुक्त करण्यात आली होती...

शीतल टाईम्स । - उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. सानप यांचा सत्कार सानप यांनी उत्तम कार्य करुन तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला - विजय भालसिंग शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
  उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. सानप यांचा सत्कार सानप यांनी उत्तम कार्य करुन तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला - विजय भालसिंग शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी     अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला असून, त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला. विजय भालसिंग म्हणाले की, नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. सहा. पो.नि. सानप यांनी उत्तमपणे कार्य करुन नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला आहे. नगर तालुक्यातील अनेक अवैध धंदे बंद झाले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नगर तालुक्यातील महामार्गावर होणारी लूट व चोर्‍याच्या घटना थांबविण्यासाठी त्यांचे उत्तमपणे नियोजन सुरु असून, या कार्यात देखील सहकार्य करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून झालेला सत्कार ही का...

शीतल टाईम्स । - बेलापुरात एकाची आत्महत्या! शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
बेलापुरात एकाची आत्महत्या!  शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी     बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे.        येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून आत्महत्या केली. बराच वेळ होवुनही ते बाहेर येत नसल्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा उघडून पाहीला असता जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.       त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालादार अतुल लोटके हे तपास करत आहे. ****************************************************** ******************************************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वल...

शीतल टाईम्स । - आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे यांच्या राहत्या घरी वर्षवास कार्यक्रम संपन्न श्रीरामपुर प्रतिनिधी

इमेज
  आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे यांच्या राहत्या घरी वर्षवास कार्यक्रम संपन्न  शीतल टाईम्स श्रीरामपुर । प्रतिनिधी पुणे येथे पाली भाषेचे अध्ययन करीत असलेले आदरणीय भंतेजी सुमेधजी बोधी यांच्या हस्ते विधीवत पूजेने संपन्न झाला वर्षावास निमित्ताने आदरणीय भंतेजींनी धम्मदेसना दिली धम्मदेसना मध्ये वर्षा वासाचं महत्त्व काय ,वर्षावास म्हणजे काय, वर्षा वासात काय काय बुद्धधम्मामधे करतात ,त्याची माहिती, बुद्ध धम्मा मध्ये दान पारमिता ला काय महत्व आहे, दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान काय , यासंबंधी उपासक-उपासिका बाल बालिका यांना आपल्या सुमधुर वाणी मधून देसना देतांना खूप चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचे नियम आणि आपल्या जीवनशैलीमध्ये वेळोवेळी काय बदल करायला हवा याबाबत अवगत केले त्याच प्रमाणे दत्तनगर येथील तक्षशिला बुद्ध विहार त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात भंतेजींनी  केली याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमांमध्ये आयुनी सुशीला सात दिवे, परीघाबाई ,छायाताई दाभाडे ,हिराबाई दाभाडे ,सुनंदा खरात ,मस्के ताई ,शिरसाठ ताई भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहिरेताई ,अलका ग...

शीतल टाईम्स । - गुप्तधनाबाबत चौकशीचे उपोषण पोलीस निरिक्षकांच्या आश्वासनानंतर मागे शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
  गुप्तधनाबाबत चौकशीचे उपोषण पोलीस निरिक्षकांच्या आश्वासनानंतर मागे शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी      खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या मागणी करीता मनसेच्या वतीने  सुरु केलेले उपोषण भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या मध्यस्थीने व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या अश्वासना नंतर मागे घेण्यात आले.     बेलापुर येथे खटोड यांच्या निवासस्थानी खोदकाम करताना गुप्तधन सापडले होते त्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची चर्चा होती. खोदकाम करणाऱ्या मजुरांनी देखील विविध वृत्तवाहीनीला मुलाखत देताना सांगीतले होते. त्यानंतर केवळ चांदीच शासनाच्या हवाली करण्यात आली. मजुरांनाही लालच देण्यात आली. त्यामुळे या सर्व घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करुन सर्व गुप्तधन शासनाने ताब्यात घ्यावे. तो सर्व निधी बेलापूरच्या विकासाकरीता वापरण्यात यावा.     वरील मागणी करीता मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोबडे उपाध्यक्षसुरेश जगताप डाँक्टर संजय नवथर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक...

शीतल टाईम्स । - गुप्तधनाबाबत वावड्या उठवून गावातील वातावरण दुषित करणारांची शासनाने दखल घ्यावी बेलापुरातील ग्रामस्थांची मागणी शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
  गुप्तधनाबाबत वावड्या उठवून गावातील वातावरण दुषित करणारांची शासनाने दखल घ्यावी  बेलापुरातील ग्रामस्थांची मागणी शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी     गावातील खटोड यांच्या घरी सापडलेले गुप्त धन शासकीय नियमानुसार पंचनामा करुन शासनाच्या ताब्यात दिलेले असतानाही काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असुन शासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे.     ग्रामस्थ व मारवाडी समाजाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या घरी खोदकाम करताना एका घड्यात चांदीची पुरातन नाणी सापडली ती त्यांनी प्रामाणिकपणे लेखी अर्ज करुन  श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ताब्यात दिली असे असताना काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे काही अति उत्साही लोक या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असुन यामुळे गावातील वातावरण खराब होवू शकते तरी या प्रकरणी आपण योग्य ती  दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी  उप...

शीतल टाईम्स । - पोलीसांनी कारवाई सुरु करताच 'ओव्हर टाईम' करणार्‍या दुकानदारांनी काढला पळ शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
  पोलीसांनी कारवाई सुरु करताच 'ओव्हर टाईम' करणार्‍या दुकानदारांनी काढला पळ  शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी     दुपारी चार नंतर  सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना गावात पाच वाजले तरी दुकाने सुरुच होती. पोलीसांनी कारवाई सुरु करताच अनेकांनी शटर बंद करुन पळ काढला.    कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ठरवुन दिलेले नियम पाळणे बंधनकारक असताना बेलापूरात त्या नियमांचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला पाच वाजले तरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत होते दुकानेही उघडी होती तसेच सर्वत्र गर्दी दिसत होती ही बाब बेलापुर पोलीसांना समजताच हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त सुरु करताच अनेकांनी शटर बंद केली पोलीसांनी काही दुकानदारांना दंड केला अनेक लोक विनाकारण ठिकठिकाणी गप्पा मारत बसले होते पोलीसांना पहाताच अनेकांनी पळ काढला पोलीसांनी बेलापुर श्रीरामपुर चौकातील दुकानदारांना अनेक वेळा दंड करुनही ते दुकानदार दुकान उघडे ठेवत आहेत...

शीतल टाईम्स । - पकडलेजाण्याच्या भीतीने रेल्वेतून मारली उडी पण, जीव घेऊन गेली मालगाडी रेल्वेच्या धडकेत श्रीरामपुरातील युवकाचा मृत्यू शीतल टाईम्स । श्रीरामपूर/प्रतिनिधी

इमेज
  पकडलेजाण्याच्या भीतीने रेल्वेतून मारली उडी पण, जीव घेऊन गेली मालगाडी  रेल्वेच्या धडकेत श्रीरामपुरातील युवकाचा मृत्यू शीतल टाईम्स । श्रीरामपूर/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील  बेलापूर रेल्वे स्थानकापासून, काही अंतरावर असलेल्या रेल्वे फेन्सिंग पाण्याच्या टाकी जवळ, शहरातील फकिरवाडा परिसरातील मुजाहिद मस्तान शेख या २३ वर्षीय युवाकाचा मृतदेह आढळुन आल्याने, हा अपघात आहे की घातपात या संदर्भात चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात मयताच्या घरच्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या नंतर, तात्काळ शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीली, आणि अरबाज शाह व इरफान सय्यद या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. सदरचा प्रकार उजेडात आला. ज्यात रात्री २ ते २ : ३० वाजेच्या सुमारास, मयत मुजाहिद शेख , इरफान सय्यद व अरबाज शाह हे चोरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या रेल्वेच्या डब्यात घुसले,त्या ठिकणी त्यांनी २ जनांचे मोबाईल देखील चोरले मात्र , रेल्वे डब्यातील लोकांच्या लक्षात आलेने, ते मयत मुजाहिद व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी येत असतांना, भीती पोटी मयत मुजाहिद शेख...

शीतल टाईम्स । - बेलापुरातील गुप्तधनाबाबत सीआयडी चौकशी करण्याची मनसेची मागणी ; सोमवारी उपोषण श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
   बेलापुरातील गुप्तधनाबाबत सीआयडी चौकशी करण्याची मनसेची मागणी ; सोमवारी उपोषण  श्रीरामपूर प्रतिनिधी     बेलापूर गावात सापडलेल्या गुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावणाऱ्या लोकांसह अधिकाऱ्यांची 'सीआयडी'मार्फत चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 'मनसे'चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदेंसह मनसैनिकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या गुप्तधनाची, गुप्त विल्हेवाट लावणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाई करून, गुप्तधन सापडलेले ठिकाण व परिसर शासनाने ताब्यात घ्यावा या मागणीसाठी सोमवारी ( दि.२६ ) बेलापूर ग्रामपंचायतीसमोर 'मनसे'च्या उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी माध्यमांना दिली. 'मनसे' जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गुप्तधनाची गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून हा परीसर शासनाने ताब्यात घेवून तेथे खोदकाम चालु करावे. या परीसरात याअगोदरही एकदा-दोनदा गुप्तधन सापडल्याची चर्चा आजूबाजूतील लोक करत आहेत. सर्व गुप्तधन ताब...

शीतल टाईम्स । - बेलापूरातून अल्पवयीन मुलगी गायब ! गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
बेलापूरातून अल्पवयीन मुलगी गायब !  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु  शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी     येथील चौदा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलगी दुपारी दोन वाजेपासून घरातून निघुन गेली असुन शोधा शोध करुनही मुलगी न सापडल्यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे.      या बाबत समजलेली हकीकत अशी की पढेगाव रोडवर असणाऱ्या पाहुणे नगर मधील एक अल्पवयीन मुलगी (वय वर्ष १४ ) दुपारी दोन वाजेदरम्यान आईला डबा घेवुन निघाली होती. परंतु ती गावात पोहोचलीच नाही. त्यामुळे तिची आई व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु कुठेही आढळून आली नाही, त्यामुळे त्यांनी  बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली. बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सी सी टिव्ही च्या अधारे शोध घेतला असता एका रस्त्याने ती मुलगी एकटीच जाताना दिसली. या बाबत पोलीसांनी अधिक चौकशी करुन माहीती घेतली असता गावातील एक २१ वर्षाचा तरुणही घरातून पैसे घेवून निघुन गेल्याची माहीती मिळाली असुन या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. *****  सा.शीतल टाईम्स  ...

शीतल टाईम्स । - गुरु पौर्णिमेनिमित्त युवकांसाठी "मी कोण होणार?"ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन भविष्यातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी वेबीनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीचा उपक्रम

इमेज
  गुरु पौर्णिमेनिमित्त युवकांसाठी "मी कोण होणार?"ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन भविष्यातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी वेबीनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीचा उपक्रम  शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी    महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.24 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत झुम अ‍ॅपवर हा निशुल्क वेबीनार होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्लबच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे व व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर कुंदा हलबे यांनी केले आहे. या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीरात विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पहिले अ‍ॅड. नीलमणी गांधी कायदे विषयक व्यवसाय संधी, ग्राहक संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसेच परदेशी विद्यापीठामध्ये शिक्षण व करिअर, आर्किटेक्चरमधील संधी, ऑनलाईन व...

शीतल टाईम्स । - आर्थिक दुर्बल असलेल्या मातंग समाजाचे प्रश्‍न कोरोनाने अधिक गंभीर - मधुकरराव पठारे जिल्हा मातंग समाज पंचकमिटी, महालक्ष्मी देवस्थान व अ‍ॅक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने महापौर रोहिणी शेंडगे यांचा नागरी सत्कार शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
  आर्थिक दुर्बल असलेल्या मातंग समाजाचे प्रश्‍न कोरोनाने अधिक गंभीर  - मधुकरराव पठारे जिल्हा मातंग समाज पंचकमिटी, महालक्ष्मी देवस्थान व अ‍ॅक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने महापौर रोहिणी शेंडगे यांचा नागरी सत्कार शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी        कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मातंग समाजाचे प्रश्‍न अधिक गंभीर बनले आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी समाजबांधवांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध राजकीय व संघटनेत काम करताना मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंचकमिटीचे अध्यक्ष मधुकरराव पठारे यांनी केले. तर प्रश्‍नांची सोडवणुक करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील माळीवाडा येथील महालक्ष्मी देवस्थान येथे जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षीय भाषणात पठारे बोलत होते. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहिणीताई शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा मातंग समाज पंचकमिट...

शीतल टाईम्स । - दिपक निकाळजे यांचे भीम गर्जनाच्या वतीने बेलापुरात स्वागत शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

इमेज
       दिपक निकाळजे यांचे भीम गर्जनाच्या वतीने बेलापुरात स्वागत  शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने बेलापुर येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.       याप्रसंगी पत्रकार सुहास शेलार यांची शितल टाईम्सच्या उपसंपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीण साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास वाघमारे. जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन शेख. उत्तर महाराष्ट्र संघटक सुनील शेळके, तालुकाध्यक्ष रफिक शाह, श्रीरामपूर शहराध्यक्ष फिरोज सय्यद, अझरुद्दीन शेख, मुनाफ पिंजारी, राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार किशोर कदम, लाडगाव शाखा अध्यक्ष आझम पटेल, मच्छिंद्र भालेराव, अनिल पवार, भैया पटेल, किरण भालेराव, संदीप भालेराव, समीर जाहागीरदार, जब्बार आतार, मुक्तार सैय्यद, मोईन खाजा शेख...

शीतल टाईम्स । - प्रामाणिकपणे काम करणाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार- आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
  प्रामाणिकपणे काम करणाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार- दीपक निकाळजे  शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी      पक्षात वर्षानुवर्षे प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी देणार असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी नगर दौऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषदेत केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा पक्ष पुनर्बांधणी व पक्ष बळकटी करण्यासाठी नुकताच नगर जिल्ह्यात दौरा झाला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना निकाळजे बोलत होते. यावेळी प्रथम मुंबई येथे दरड कोसळून मृत  झालेल्याना व बापा शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोलताना निकाळजे म्हटले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना 1990 साली झाली या पक्षात गेली बावीस वर्षापासून काम करत असून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारसरणीत पक्ष बळकटीचे काम करीत आहे. सन 2018 मध्ये आठवले यांनी रिप...

शीतल टाईम्स । - पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सह्यांची मोहीम केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी बेलापूर ।- शकील शेख यांजकडून

इमेज
पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सह्यांची मोहीम  केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी बेलापूर ।- शकील शेख यांजकडून         महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर, आमदार लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेत्रूत्वा खाली केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या भावामध्ये केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ श्रीरामपुर तालुका विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.     या प्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, पंचायत समिती सदस्या वंदनाताई मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, कृउबा समितीचे संचालक सुधीर नवले,ऐनतपुर सोसायटी ...

शीतल टाईम्स । - लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी - अमोल लगड चुकीच्या सुचना देऊन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना घरी पाठवले जात असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्तांना निवेदन शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
  लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी - अमोल लगड चुकीच्या सुचना देऊन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना घरी पाठवले जात असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्तांना निवेदन  शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी      लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागपूर आरोग्य केंद्रावर लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी वर्ग चुकीच्या सूचना सांगत आहे. यामुळे नागरिक केंद्रावरून निघून जातात. नागरिक केंद्रावरून घरी गेल्यावर काही ठराविक लोकांना दुपारी तीन वाजल्याच्या नंतर फोन करून बोलावून लस दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारनंतर ठरावीक नागरिकांना होत असलेल्या  लसीकरणाबाबत कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता, वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन लसीकरण करावे लागत असल्याचे ते सांग...

शीतल टाईम्स । - डॉ.अनिल मासुरकर जीवनावरील “अनमोल ठेवा”पुस्तकचे प्रकाशन शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी

इमेज
डॉ.अनिल मासुरकर जीवनावरील “अनमोल ठेवा”पुस्तकचे प्रकाशन  शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी       गुरुवारी झूम मिटवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात रूग्णाचे देव असणारे साखर कामगार व सेंट लुक हॉस्पिटल श्रीरामपूरचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मासुरकर यांच्या जीवनावर आधारित, त्यांचे बंधू सुधीर यांनी लिहिलेले, डॉ मासूरकर यांच्या स्नेहीनी आपल्या जीवनात त्यांचे अनुभव, मनोगत याबद्दल दिलेले लेख असलेले”अनमोल ठेवा”या पुस्तकाचे प्रकाशन दि १५ जुलै रोजी करण्यात आले.     कार्यक्रमाचे सूत्र संचालन रश्मी व तनया जिंदल यांनी केले. यावेळी शैलजा वैद्य यांनी कविता सादर केली. सरोज नाईक या भगिनी म्हणाल्या मी चार वर्षाची असताना डॉ अनिल यांचा जन्म झाला. आज तोच आमचा दादा आहे.आमच्या करिता अनिलने जे केले त्याचे उपकार विसरू शकत नाही. बंधू सुधीर यांनी मोठ्या कष्टाने हे पुस्तक लिहिले आहे. स्व.डॉ सुमती मासूरकर यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले.डॉ उदय खांबेटे म्हणाले डॉ मासूरकर यांच्या मुळेच मला सेंट लुक हॉस्पिटलला काम करण्याची संधी मिळाली. माधव देशपांडे या...

शीतल टाईम्स । - नामदेव प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योध्दांचा सन्मान शीतल टाईम्स । श्रीरामपूर । प्रतिनिधी

इमेज
नामदेव प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी   कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या ऋणातून उतराई होण्यासाठी - कोरोना यौध्दांचा सन्मान होणे गरजेचे आहे. अहमदनगर नामदेव प्रतिष्ठाण या संस्थेने हा उपक्रम राबविल्याने कोरोना योध्दांना शाबासकीची थाप मिळाली असल्याचे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी करोना योध्दांचा सत्कार समारंभाप्रसंगी केले. प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आ. कानडे पुढे म्हणाले की, संत नामदेवांनी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. सर्व संतांना बरोबर घेऊन त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचा धावा केला. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विषयी अनेक उत्तम प्रसंग सांगून त्यांची ख्याती श्रोत्यांपुढे मांडली. संत नामदेवांविषयी समाजाला अतिशय सविस्तर माहिती देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अमदनगर नामदेव प्रतिष्ठानला आमदार निधीतून सभामंडपसाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही यावेळी आ. कानडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. लहू कानडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर...

शीतल टाईम्स । - केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक : ना.बाळासाहेब थोरात राज्यात कायदा लागू न करण्याची आडते बाजार व्यापारी असोसिएशनची मागणी शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

इमेज
   केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक : ना.बाळासाहेब थोरात राज्यात कायदा लागू न करण्याची आडते बाजार व्यापारी असोसिएशनची मागणी शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी    केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी  संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांच्या पुढाकारातून आणि शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड याठिकाणी ना.थोरात यांच्या नगर दौऱ्या दरम्यान पार पडली. यावेळी ना.थोरात बोलत होते.  निवेदन देत व्यापाऱ्यांना केंद्राच्या या अन्यायकारक कायद्यापासून वाचवावे अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी ना. थोरात यांच्याकडे केली आहे. मंत्री ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारचा साठव...