पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स //- उलट्या दिशेने चालत बापूराव गुंड देतायत माणुसकीचा संदेश

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी उलट्या दिशेने चालत बापूराव गुंड देतायत माणुसकीचा संदेश बेलापूर (प्रतिनिधी) – "समाज सरळ वाटेने चालावा म्हणून मी उलट्या दिशेने चालतोय!" असा अनोखा संदेश देणारे फुरसुंगी (पुणे) येथील बापूराव गुंड सध्या पंढरपूर ते शिर्डी असा प्रवास उलट्या दिशेने करत आहेत. माणुसकी, आपुलकी, सहकार्य आणि शांततेचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा वेगळाच मार्ग निवडला आहे. बेलापूर येथे कृषी विद्यापीठाजवळील रस्त्यावरुन उलट्या दिशेने चालत असलेले हे भगवे वस्त्रधारी महंत पत्रकार देविदास देसाई यांच्या लक्षात आले. थांबून संवाद साधल्यावर बापूराव गुंड यांनी आपल्या प्रवासामागील हेतू स्पष्ट केला. “आजच्या समाजात माणुसकी हरवत चालली आहे. तिरस्कार, हेवा, द्वेष यामुळे माणूस दुःखी झाला आहे. म्हणूनच मी उलट्या दिशेने चालून लोकांना सरळ मार्गाचा संदेश देतोय,” असे त्यांनी सांगितले. तसेच प्रवासात त्यांना जाणवणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांबाबत त्यांनी राज्य व केंद्र शासनाला सूचना पाठवल्याचेही त्यांनी नमूद केले. “शासनाने योग्य निर्णय घेतल्यास रस्ते अपघात कमी होऊ शकतात,” असा विश्वासही त्यांनी व...

शीतल टाईम्स //- १५ वर्षांच्या सेवेबद्दल पोलीस कॉन्स्टेबल बडे यांचा बेलापूरात सन्मान

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी १५ वर्षांच्या सेवेबद्दल पोलीस कॉन्स्टेबल बडे यांचा बेलापूरात सन्मान बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या निय...

शीतल टाईम्स //- चारी क्रमांक ३२ व ३३ वर अतिक्रमण; पाणीपुरवठा बंद; शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी चारी क्रमांक ३२ व ३३ वर अतिक्रमण; पाणीपुरवठा बंद; शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन बेलापूर (प्रतिनिधी)  बेलापूर परिसरातील चारी क्रमांक ३२ व ३३ वर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर-वडाळा शाखेला निवेदन देत तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. हे निवेदन लोकनेते भानुदासजी मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. चारीवरील अतिक्रमण हटवून त्याचे दुरुस्ती काम तत्काळ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन स्वीकारताना शाखा अभियंता इंजिनिअर कलापुरे यांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना प्रमुख शेतकरी दीपक निंबाळकर , भगवान सोनवणे , विक्रम नाईक व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सांगितले की, "चारी बंद असल्याने आम्हाला सिंचनासाठी पर्यायी व महागड्या साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे." या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास...

शीतल टाईम्स //- बेलापूर-ऐनतपूरमध्ये महिला मेळावा यशस्वी; ना.विखेंच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविणार - शरद नवले

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर-ऐनतपूरमध्ये महिला मेळावा यशस्वी  ना.विखेंच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविणार - शरद नवले  बेलापूर (प्रतिनिधी) - बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याला बेलापूर-ऐनतपूर परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या प्रचंड उपस्थितीमुळे मेळावास्थळ फुलून गेले होते. संपूर्ण व्यासपीठावर महिलांचीच उपस्थिती लक्षवेधी ठरली. गेल्या अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा एकत्रित मेळावा झाल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. शरद नवले यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरण हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध उपक्रम आणि शासकीय योजना सातत्याने राबविल्या जात आहेत.” अध्यक्षस्थानी सरपंच मिनाताई साळवी होत्या. कार्यक्रमाला बाजार समिती...

शीतल टाईम्स //- दिव्यांग मदतीचा कर्मचाऱ्याला ५० हजारांचा "भूर्दंड"; इज्जतीचा पंचनामा!

इमेज
शीतल टाइम्स प्रतिनिधी दिव्यांग मदतीचा कर्मचाऱ्याला ५० हजारांचा "भूर्दंड"; . इज्जतीचा पंचनामा! बेलापूर (प्रतिनिधी) – एका दिव्यांग व्यक्तीस मदतीच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्याने स्विकारली, पण ही जबाबदारी त्याला चांगलीच महागात पडली. अखेर ५० हजार रुपये रोख रक्कम भरावी लागली आणि सामाजिक इज्जतीचाही पंचनामा झाला. रात्री उशिरा हा सगळा प्रकार मिटवण्यात आला, तेव्हा कुठे त्या कर्मचाऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला. घडलेली घटना अशी – परिसरातील एका कुटुंबात दिव्यांग मुलगा असल्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला त्या मुलाच्या घरी जाऊन सर्व शासकीय योजनांची माहिती देण्याचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे तो कर्मचारी त्या घरात गेला आणि त्या दिव्यांग मुलाच्या आईला लाभाच्या योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत, अडचण आल्यास संपर्क साधण्यास स्वतःचा फोन नंबर दिला. यानंतर त्या महिलेने दिवसभर वेगवेगळ्या कारणांवरून त्याला फोन केले. संबंधित कर्मचारी प्रामाणिकपणे सर्व चौकशीला उत्तर देत होता. परंतु संध्याकाळी अ...

शीतल टाईम्स //- पुणतांबा येथील बोर्डे बंधू बनले शासकीय अधिकारी! धीरज जलसंपदा विभागात अभियंता, तर सूरज नगरपालिका लेखाधिकारी

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी पुणतांबा येथील बोर्डे बंधू बनले शासकीय अधिकारी! धीरज जलसंपदा विभागात अभियंता, तर सूरज नगरपालिका लेखाधिकारी श्रीरामपूर (प्रतिनिधी) – पुणतांबा येथील रहिवासी धीरज व सूरज संपतराव बोर्डे या जुळ्या बंधूंनी शासकीय सेवेत उल्लेखनीय यश मिळवत आपल्या कुटुंबीयांचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे. धीरज बोर्डे यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) पदासाठी झाली आहे. त्यांनी यासाठी घेतलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे. दुसरीकडे, सूरज बोर्डे यांची सन २०२० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून सध्या ते बुलढाणा नगरपालिकेत कार्यरत आहेत. धीरज व सूरज हे दोघेही अशोक सहकारी साखर कारखान्यातील माजी कर्मचारी श्री. संपतराव बोर्डे यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही जुळे बंधू असून, त्यांच्या एकाच वेळी शासकीय सेवेत निवडीची ही घटना गावासाठी दुर्मिळ आणि प्रेरणादायी ठरली आहे. बोर्डे बंधूंच्या या यशाबद्दल भास्कर खंडागळे, नानासाहेब जोंधळे, अ‍ॅड. एन. जी. खंडागळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक ...

शीतल टाईम्स //- श्रीरामपूर पोलिसांची यशस्वी कारवाई – ATM चोरीचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद!

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी श्रीरामपूर पोलिसांची यशस्वी कारवाई – ATM चोरीचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद! श्रीरामपूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी) – शहरातील कोल्हार चौकात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या एटीएम फोडण्याच्या घटना आता उलगडू लागल्या असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एक मोठी टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. दिनांक 06 जून 2025 रोजी सधीर प्रभाकर धालपे यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी कारमधून येत मशीन बाहेर ढकलून चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 14 जुलै रोजी पुन्हा एकदा गॅस कटरच्या सहाय्याने त्याच एटीएम मशीनला फोडण्याचा प्रयत्न झाला. या दोन्ही घटनांमध्ये मारुती 800 या निळ्या रंगाच्या कारचा वापर झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले. गुप्त माहितीमुळे मिळाले यश 24 जुलै रोजी संध्याकाळी बेलापूर बाजारतळ परिसरात संशयास्पदपणे उभी असलेली मारुती 800 कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी चौकशी केली असता, कारमधील व्यक्तींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पो...

शीतल टाईम्स //- बिबट्याच्या धडकेत मायलेक जखमी; सुदैवाने वाचले प्राण

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी बिबट्याच्या धडकेत मायलेक जखमी; सुदैवाने वाचले प्राण बेलापूर (प्रतिनिधी) – आंबी येथून पुण्याकडे निघालेल्या मायलेकांच्या मोटरसायकलला अचानक बिबट्याने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. सुदैवाने प्राणहानी टळली असून, त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्यासाठी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता मोटरसायकलने निघाले होते. दरम्यान, श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर त्यांच्या गाडीला अचानक एका बिबट्याने जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याही काही अंतरावर फेकला गेला, तर विशाल आणि अलका वायदंडे रस्त्यावर पडून जखमी झाले. धडक दिल्यानंतर बिबट्या तात्काळ जवळील झुडपांमध्ये निघून गेला. दोघांनाही तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या थेट धडकेतूनही प्राण वाचल्याने मायलेकांनी देवाचे...

शीतल टाईम्स //- विजेचा धक्का बसूनही वाचलेले वायरमन अनिल दोंड यांचा सत्कार बेलापूर (प्रतिनिधी - शीतल टाईम्स )

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी विजेचा धक्का बसूनही वाचलेले वायरमन अनिल दोंड यांचा सत्कार बेलापूर (प्रतिनिधी - शीतल टाईम्स ) "देव तारी त्याला कोण मारी?" या मराठी म्हणीची प्रचिती महावितरणचे वायरमन अनिल दोंड यांना प्रत्यक्ष अनुभवावी लागली. वीज खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसूनही त्यांचे प्राण वाचले आणि आज ते पुन्हा कामावर हजर झाले आहेत. अनिल दोंड हे बेलापूर, ऐनतपूर, वळदगाव, उंबरगाव परिसरात मरावीज कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी उंबरगाव येथील वीज वितरण डीपीवर जंक कट झाला होता. वीज प्रवाह खंडित करून दोंड खांबावर चढले आणि दुरुस्ती करत असताना अचानक वीज प्रवाहित झाली. त्यांना तीव्र धक्का बसून ते खाली कोसळले, परंतु त्यांच्या पायाचा अंश डीपीच्या लोखंडी भागात अडकल्याने ते हवेत लटकले. खाली उभे असलेले शेतकरी घाबरून गेले, कोणालाही त्यांना वर जाऊन खाली आणायची हिंमत झाली नाही. तत्काळ त्यांच्या मुलाला व मरावीज कंपनीचे अधिकारी चव्हाण व वाणी यांना संपर्क साधण्यात आला. लोक जमा होईपर्यंत दोंड बेशुद्ध अवस्थेत लटकत होते. त्यानंतर त्यांना खाली उतरवून तातडीने...

शीतल टाईम्स //- 🎯 सिने स्टाईल पाठलागात ATM फोडण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपी जेरबंद

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी 🎯 सिने स्टाईल पाठलागात ATM फोडण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपी जेरबंद बेलापूर (प्रतिनिधी) – कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन वेळा अपयशी ठरवणाऱ्या चोरट्यांना अखेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कान्हेगावजवळ ताब्यात घेतले. आरोपी बेलापूर ते पढेगावमार्गे वेगाने पळाले, परंतु पोलिसांनी शिताफीने त्यांचा माग काढत लाडगावजवळ त्यांना अटक केली. 🕵️ दोन वेळा अयशस्वी प्रयत्न, तिसऱ्यांदा मोठा प्लॅन कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम फोडण्याचा प्रयत्न निळ्या रंगाच्या मारुती 800 गाडीतून आलेल्या काही इसमांनी दोन वेळा केला होता. दोन्हीवेळी सीसीटीव्हीमध्ये त्यांची हालचाल कैद झाली होती. या गाडीची ओळख व्हॉट्सअ‍ॅपवरून गावात व्हायरल झाल्याने ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली होती. 👮 सजग नागरिक आणि पोलिसांची तत्परता शंका निर्माण झाल्याने गावातील एका सुज्ञ नागरिकाने ही बाब बेलापूर पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांनी तत्काळ बाजारतळाजवळ पोहोचून संशयास्पद गाडी तपासली. पोलिस असल्याचे लक्षात येताच आरोपींनी गाडीने पळ ...

शीतल टाईम्स //- संत सावता महाराजांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक – ह.भ.प. अनिल महाराज महांकाळे

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी "संत सावता महाराजांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे!" – ह.भ.प. अनिल महाराज महांकाळे ✍️ शीतल टाईम्स प्रतिनिधी | बेलापूर संत सावता महाराज म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि कर्मयोग यांचा संगम असून त्यांच्या चरित्राचा अभ्यास हा आजच्या तरुण पिढीसाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. अनिल महाराज महांकाळे यांनी केले. बेलापूर येथे संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या भव्य धार्मिक कार्यक्रमात काल्याच्या कीर्तनातून ते मार्गदर्शन करत होते. 📜 “संतांचे चरित्र म्हणजे दिशा” – ह.भ.प. महांकाळे “प्रत्येकाने आपले कर्म करताना त्यामध्ये प्रामाणिकता ठेवली पाहिजे. आज समाजात अराजकता वाढत चालली आहे. नैराश्य, आत्महत्या, चुकीचे निर्णय यामागे अध्यात्मिक मूल्यांचा अभाव आहे. अशा वेळी संत सावता महाराजांचे जीवन हे प्रेरणादायी ठरू शकते,” असे सांगत ह.भ.प. महांकाळे यांनी संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, "संकटांपासून पळून न जाता, त्यांचा सामना भक्तिमार्गाने आणि संयमाने कर...

शीतल टाईम्स //- “निर्मल वारी”मुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर — १० वर्षांच्या प्रयत्नांना यश ✍🏻 शीतल टाईम्स प्रतिनिधी | अहिल्यानगर

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी  “निर्मल वारी”मुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर — १० वर्षांच्या प्रयत्नांना यश  ✍🏻 शीतल टाईम्स प्रतिनिधी | अहिल्यानगर पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा. दरवर्षी लाखो वारकरी टाळ, मृदुंग आणि हरिपाठाचा जयघोष करत दिंडीद्वारे पंढरपूरला पायी वारी करतात. मात्र या प्रवासात अनेक वेळा स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्यामुळे वारीच्या मुक्कामी वारकऱ्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व अनारोग्याचे वातावरण निर्माण होत होते. ही गंभीर समस्या ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्था यांनी २०१५ पासून ‘निर्मल वारी’ या उपक्रमाची सुरुवात केली. यामागील उद्देश स्पष्ट होता – वारी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी करणे. 🚻 फिरते शौचालय आणि उत्कृष्ट व्यवस्थापन विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत यंदा राज्य शासनाच्या मदतीने तब्बल २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले. या शौचालयांचे व्यवस्थापन, देखभाल आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वयंसेवकांनी समर्थप...

शीतल टाईम्स //- श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य सांगता

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य सांगता बेलापूर (प्रतिनिधी) : बेलापूर बुद्रुक येथील संत सावता महाराज मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार, दिनांक २३ जुलै रोजी होणार आहे. या सांगता सोहळ्यात ह.भ.प. अनिल महाराज महांकाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ही पारायण मालिका संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दिनांक १६ जुलैपासून प्रारंभ झाली होती. सात दिवस चाललेल्या या अध्यात्मिक सप्ताहात विविध किर्तनकारांच्या माध्यमातून भाविकांना ज्ञान, भक्ती आणि हरिपाठाचा आनंद अनुभवायला मिळाला. या सप्ताहात ह.भ.प. मयूर महाराज बाजारे, डॉ. शुभम महाराज कांडेकर, विजय महाराज कोहिले, कृष्णा महाराज शिरसाठ, जीवराम महाराज कापंडेकर, मोहन महाराज बेलापूरकर व वीर महाराज यांनी कीर्तनसेवा केली. पारायण सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री ज्ञानेश्वरी पारायण...